Breaking News
recent

निवडणुक प्रक्रियेला जातिय रंग देणाऱ्या अधिकाऱ्यांन विरोधात न्यायालयात जाणार : गोपाल तायडे

 

शेगाव : प्रतिनिधी.

  स्थानिक स्वराज्य स्वस्थाच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगा कडून मिळाले आहेत .त्या नुसार प्रभाग रचना व प्रारूप मतदार यादी तसेच अंतिम मतदार यादी नगर परिषदे कडून जाहीर करण्यात आल्या होत्या त्या करिता हरकती, तक्रारी,  तारखा ही देण्यात आल्या होत्या. त्या नुसार प्रभाग क्र. 4 या मतदार यादी बद्दल आक्षेप घेण्यात येऊन मातंग समाजातील मते इतर प्रभागात वळविण्यात आल्या असल्याची रीतससर तक्रार अर्ज दी. 4/7/022  रोजी मातंग समाजावतीने मुख्यअधिकाऱ्यांना देण्यात आला होता.

  त्यामधील नमूद करण्यात आलेल्या विषया कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून नगर परिषद प्रशासना कडून कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रभाग क्र.4  मधील  मातंग समाजातील मतदारांची विभागणी करून मतदार इतर प्रभागा मध्ये हेतू पुरस्पर टाकुन मातंग समाजा ला विभागण्याचा कुटील डाव आखण्यात आला असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला आहे.मातंग समाजाला नगर परिषदे कडून नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली आहे. नगर परिषदेच्या कृतीतून  वारणावर दिसते  दलित असलेल्या मातंग समाजाच्या कोणत्याच समास्याला नगर परिषदे  गांभीर्याने घेतल्या नाही.अत्यंत कळवट विरोध दलित मातंग समजावर करण्यात आला आहे. ते मघ शेगाव विकास आराखडा अंतर्गत पुनर्वसन करीत आस्थाना मातंग समाजाच्या घरांचे चुकीचा सर्वे करून खाजगी व पूर्वा पार राहत असलेल्या मातंगपुरीला अतिक्रमन धारक दाखवून. 

   मोक्याच्या जागेरून जबरीने उठून देणे असे, की मातंग समाजातील आराध्य दैवतांनच्या  दोन्ही महापुरुषांच्या स्मारकां बद्दल दुजाभाव असो की पुनर्वसन करण्यात आलेल्या कॉलनीत उद्भवलेल्या अनेक समस्या बद्दल असो अश्या अनेक समस्या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष नगर परिषद करीत असल्याचे अनेक उधारणे आहेत. परंतु हया  वेळेस अन्याचा जो कळस नगर परिषदे कडून गाठण्यात आला आहे. तो असह्य आहे एका दलित समाजाला समाजाच्या मुख्यप्रवाहत न आणता कोणच्या तरी सांगण्यावरून संघटीत असलेला मातंग समाजाला असंघटित करून त्यांचे मते विभागून पडद्यामागून कुटील षड्यंत्र आखून मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू नये करता नियोजित कट आखण्यात आला आहे. असा गंभीर आरोप गोपाल तायडे  यांच्या कडून कारण्यात आला असून या अन्याया विरोधात न्यायालयात दाद माघू असे त्यांनी म्हटले आहे.

Powered by Blogger.