पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, वरणगाव च्या शिरपेचात मानाचा तुरा
दहावी व बारावी CBSE बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
गोपाळ कळसकर @ प्रतिनिधी
भुसावळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सीबीएसई परीक्षा दहावी व बारावी चे निकाल घोषित झाले या परीक्षेत पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव च्या विद्यार्थ्यांनी अनोखे यश संपादन केले आहे . दहावी व बारावीच्या परीक्षेत पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव चा १०० टक्के निकाल लागला असून १० वी च्या परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. पीएमश्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगावच्या ईश्वरी प्रवीण अहिरे हिने ९८.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे . तसेच वैष्णवी संजय बरकडे ९८.६ द्वितीय क्रमांक ,अनुष्का प्रमोद मुंतोडे ९६.२ टक्के तृतीय क्रमांक व रिशिता चौधरी या विद्यार्थिनीने ९६ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. बारावी परीक्षेत सहा विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांकावर पल्लवी पाटील 86.4 टक्के ,द्वितीय क्रमांकावर अथर्व सरकार ७२.६ व तृतीय क्रमांकावर आदित्य कुमार ७२ टक्के गुण मिळवले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयुध निर्माणी वरणगाव चे मुख्य महाप्रबंधक तसेच विद्यालय प्रबंधन समितीचे अध्यक्ष मा.श्री. एम. झेड. सरवर, प्राचार्या. सु.श्री. रागिणी गजभिये, शिक्षक ,कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील शिक्षक वृंद व व पालकांना दिल्याचे यावेळी सांगितले.