तोरणदारी मरणदारी भाषण बंदीच्या जनजागृतीचे विस्मरण - प्रशांत ढोरे पाटील
चिखली - दिवसेंदिवस सर्वत्र लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात साजरे होत आहेत,परंतु सामाजिक कार्यकर्त्यांना कुठेतरी तोरणदारी मरणदारी भाषण बंदीच्या जनजागृतीचा विसर पडलेला दिसत आहे परत एकदा ही चळवळ उभारून लग्न प्रसंगी भाषणबाजी व सत्कार समारंभाला ला तिलांजली देणे गरजेचे झाले आहे.सर्वत्र लग्न समारंभाची धावपळ सुरू असून अतिशय दाट तिथी असल्याने सामान्य नागरिकांना देखील नेत्यानंप्रमाणे एकाच दिवशी आठ दहा नातेवाईकांच्या लग्नकार्यात उपस्थित राहावं लागतं आहे,प्रत्येक नातेवाईकाला वेळ देता यावा यासाठी आटोकाट धावपळ वऱ्हाडी मंडळींची होतांना दिसत असते,अश्यातच आयोजक वधू वर पित्यांना पुढाऱ्यांचे मंडपाला पाय लागल्याशिवाय लग्न विधीला किती ही उशीर झाला तरी चैनच पडत नसल्याचे चित्र सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहे,आजकाल बहुतेक लग्नात नेत्यांचे भाषण,सत्कार हे सामान्य नागरिकांसाठी डोके दुःखी ठरत आहे,यामुळे कित्येक जवळचे नातेवाईक तर या भाषण बाजी व सत्कार समारंभापायी लग्न न लावता वधू वराला फक्त भेटी देऊनच परतत असतात,यासाठी आयोजकांनी गेटवरच थांबून आलेल्या सर्व नेत्यांचे व पाहूनेमंडळींचे स्वागत केल्यास वेळ वाचवने शक्य आहे म्हणून कुठेतरी सामाजिक भान आयोजकांनी ठेवायला हवं व आपण इतका खर्च करून थाटामाटात आपल्या लेकरांच्या विवाहाच आयोजन करत असतो.
आलेल्या पाहुण्यांसाठी पंचपक्वान्न बनवून ठेवलेले असतात परंतु आपल्या सत्कार भाषणाच्या नादात वेळेच्या नियोजना अभावी त्याचा आस्वाद घ्यायला देखील कोण नातेवाईक उपस्थित असतात की नाही याचे देखील भान या पुढाऱ्यांच्या उपस्थितीने हुरळून गेलेल्या आयोजकांचे नसते त्यांना इतर नातेवाइकांकडे लक्ष दयायला देखील वेळ नसल्याची खन्त कित्येक राजीकीय विरहित नातलगांची असते,बहुदा भाषण, सत्कारामुळे सध्यातरी एक ही लग्न मुहूर्तावर लागतांना दिसत नाही ,ही प्रथा कुठेतरी थांबणे गरजेचे आहे,सध्याचे लग्न ,सवडण्या मातीचे कार्यक्रम हे राजकिय आखाडा आहे की लग्न सोहळा आहे हे समजायलाच मार्ग नाही ,तरी एक तर आता सर्वात प्रथम आयोजकांनी सुधारणे गरजेचं आहे नाहीतर पुढाऱ्यांनी तरी भाषण बाजी स्वतः हुन टाळने गरजेचे आहे हे जर सुधारणार नसतील तर येत्या काही काळात सामान्य नागरिक अश्या लग्नात फक्त भेटी देऊन आयोजकांना व भाषण बाजी करणारांनाच उपस्थित राहवे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होतांना दिसत आहे,आता परत एकदा कुठेतरी तोरणदारी मरणदारी भाषण बंदीची पुन्हा जोमाने जनजागृती होणे गरजेचे असून लग्नप्रसंगी भाषणांना तिलांजली देणे आवश्यक असल्याचे रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.