Breaking News
recent

बोगस खत बियाणे विक्रेते यांच्यावर कार्यवाही करण्याची संभाजी ब्रिगेड चे स्वप्नील पाटील तळणीकर यांची मांगणी



      नांदेड प्रतिनिधी 

  १३जुन-ज्या खतास शासकीय परवाना नाही अश्या खतास तात्काळ बंदी आणून कार्यवाही करावी. गतवर्षीच्या शेतमालाचे भाव उतरल्याने आधीच शेतकऱ्यांच्या खिशात कमी उत्पन्न आले आहे. त्यात अवकाळीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे सगळे •बजेट कोलमडून गेले आहे. विमा कंपन्यांकडुन उघडपणे शेतकऱ्यांची लूट होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषी खात्याकडे पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात येत आहेत.

 दरवर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागते, ही शेतकऱ्यांची आर्थिक लूट आहे. कृषी खात्याने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आळा घालावा, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळतील याकडे लक्ष द्यावे.खरीप हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना खतांची टंचाई जाणवते. अनेकदा ही टंचाई कृत्रिम असते. कृषी खात्याने खतांच्या या साठेबाजीला आळा घालून शेतकऱ्यांना सुरळीतपणे खतपुरवठा होण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे.

अनेक खतविक्रेते खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांना चढ्या दराने खतांची विक्री करतात. अशा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई केली जावी. सध्या बाजारात “ओ फॉर्म” नसलेल्या ऑरगॅनिक खतांची विक्री होत आहे. याकडे कृषी खात्याने लक्ष द्यावे व त्यांचे नमुने घेण्यात यावे.वरील सर्व मागण्यांचा कृषी खात्याने गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार बियाणे मिळण्याची, खतांच्या साठेबाजीला आळा घालण्याची, बोगस खते-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची हमी द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना नाडणाऱ्या लोकांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर दिले जाईल.


पेरणीच्या गडबडीत शेतकरी बांधवांनी खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे, त्या खूप गरजेच्या आहेत.


१) बियाणे खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून त्याचे पक्के बिल घ्या.

२) बियाण्याची पिशवी नेहमी खालच्या बाजूने फाडा.

३) मूठभर बियाणे एका डब्यात भरुन शिल्लक ठेवा.

४) बियाण्याचे बिल, बियाण्याची पिशवी आणि मूठभर बियाणे सॅम्पल पीक निघेपर्यंत जपून ठेवा.


Powered by Blogger.