Breaking News
recent

अनिल खंदारे यांनी ग्रामीण साहित्यिक यांना व्यासपीठ निर्माण करून दिले -लक्ष्मण खरात

 


मंठा/ता. प्र.शिवाजी खंदारे

 मंठा सारख्या ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन घेऊन साहित्य परिषद चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल खंदारे यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण साहित्यिक यांना व्यासपीठ निर्माण करून दिले असे मत किर्ला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खरात यांनी व्यक्त केले.

    किर्ला येथे आज जिल्हा परिषद शाळे कडून अनिल खंदारे यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना खरात म्हणाले कि खंदारे यांनी मंठा सारख्या ठिकाणी अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन घेऊन तळा गाळातील नवोदित साहित्यिक यांना योग्य न्याय देऊन हक्काच व्यासपीठ निर्माण करून दिल असे उपक्रम झाल्यास मुलांना प्रेरणा मिळून त्त्यांच्या प्रतिभा शक्तीला चालना मिळेल असेही ते बोलले.

          सत्काराला उत्तर देतांना अनिल खंदारे म्हणाले कि हे संमेलन यशस्वी करण्या साठी सर्व स्तरावरून सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मदद केली साहित्य रसिक यांनी भरभरून प्रतिसाद दिला राज्यभरातून साहित्य प्रेमी आले याच पद्धतीने सहकार्य राहिले तर पुढील ग्रामीण साहित्य संमेलन मंठा तालुक्यात घेऊ असे बोलले.

  यावेळी शाळेतील कर्मचारी,विध्यार्थी यांच्या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

Powered by Blogger.