Breaking News
recent

मराठवाड्याच्या विकासासाठी लोणीकर यांची मंत्री मंडळात गरज - अनिल खंदारे

 


मंठा  ता. प्रतिनिधी शिवाजी खंदारे   

- राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या मुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे, वाटर ग्रीड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी इस्राईल च्या धर्तीवर राबवण्याच्या प्रयन्त केला त्यामुळं अश्या महत्वकांक्ष नेत्याचा मंत्री मंडळात समावेश झाल्याने मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून गती प्राप्त होईल असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा मानव सुरक्षा सेवा संघांचे राष्ट्रीय सदस्य अनिल खंदारे यांनी व्यक्त केले.

               याविषयी सविस्तर वृत्त असे कि राज्यात नुकतेच अनेक राजकीय घडामोडी नंतर सत्तानंतर झाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन प्रत्यक्षात कामकाज सुरु झाले, रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान आता या सरकार पुढे आहे,फडणवीस सरकार च्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने लोणीकर हे नाव पुढे येते स्वच्छता व पाणी पुरवठ्या सारख्या दुर्लक्षित खात्याला त्यांनी वेगळं स्थान निर्माण करून दिल.

     परतूर मंठा विधानसभा मतदार संघा सह मराठवाडा वाटर ग्रीड चा प्रकल्प इस्त्राईल च्या धर्तीवर राबवला, याच बरोबर शेगाव ते पंढरपूर ला जोडणारा दिंडी महामार्ग पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत शेतकरी व कष्टकरी यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले अश्या विकासाभिमुख नेत्याची मंत्री मंडळात वर्णी लागल्यास नक्कीच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील या साठी बबनरावजी लोणीकर हे मंत्री मंडळात असणे गरजेचं आहे असं मत खंदारे यांनी व्यक्त केले

Powered by Blogger.