अंबाबरवा अभयारण्यात आज प्राणीगणना २५ मचान २२ कर्मचारी तैनात
संग्रामपूर कोरोनामुळे गेले दोन वर्ष रखडलेली अंबाबरवा अभयारण्यातील प्राणी गणना आज १६ मे रोजी बुध्द पौणिमेच्या पर्वावर शासन नियमा होत आहे. •यासाठी सोनाळा वन्यजीव विभाग कार्यालयाने पुर्णतः तयारी केली असुन यासाठी २५ मचान व २२ कर्मचारी तसेच ३० वनमजुर तैनात केले आहेत. आज दुपारी या तयारीचा आढावा वन्य जीव विभागाच्या वतीने घेण्यात आला. निसर्ग नियमानुसार वर्षातील प्रखर उजेड व चंद्राचा पुर्णतः आकार बुध्द पोर्णीमेला असतो म्हणुनच राज्यभर याच दिवशी प्राणी गणना केल्या जाते.
यावर्षीच्या प्राणी गणनेसाठी ३५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दोन वर्षापासून प्राणी गणना न झाल्याने नियमाचे काटेकोर पालन वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याकडून केल्या जात आहे . यावर्षी फक्त ७ पर्यटकांना प्राणी गणनेत सहभागी होण्याची मुभा शासन निर्देशानुसार देण्यात आली यामधे वाशीम अमरावती बुलडाणा येथील पर्यटकांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.गेल्या १० दिवसा पासुन प्राणी गणनेची तयारी वन्य जीव विभागाचे कर्मचारी करत असल्याचे वनपरी क्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांनी आज सायंकाळी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले १६ मे रोजी पर्यटक व वन कर्मचाऱ्यांना भोजन देऊन यानंतर नियोजीत ठिकाणावरील मचाना पर्यंत राखीव क्षेत्रात त्यांना सोडुन देण्यात येइल अशी माहीती त्यांनी बोलतांना दिली.