कवींनी भूमिकेशी प्रामाणिक राहून लिखाण करावे किरण डोंगरदिवे यांचे प्रतिपादन
चिखली
स्थानिक श्री शिवाजी विद्यालय, चिखली येथे महाकवी वामनदादा कर्डक जयंती शताब्दी वर्षा निमित्त अक्षर साधना साहित्य संघ,चिखली,जि. बुलडाणा यांचे वतीने महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष मेहकर येथील कवी, साहित्यिक तथा समीक्षक, किरण डोंगरदिवे हे होते तर प्रमुख अतिथी डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे (प्रसिध्द साहित्यिक, बुलडाणा)डी. आर. बांगर (माजी सैनिक तथा साहित्यिक लोणार) पत्रकार सचिन खंडारे, प्रशांतभैय्या डोंगरदिवे हे उपस्थित होते दै देशोन्नतीचे पत्रकार राजेंद्र काळे यांचे हस्ते सदर कवीसंमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. ए. खरात यांनी केले.
या कवीसंमेलनात रवीकिरण वानखेडे,(बुलडाणा),एजाज़ खान एजाज़ (साखरखेर्डा) प्रदीप इक्कर, (कोकरांबा), प्रवीण काकडे,( दे. राजा), संदीप गवई,(मेहकर), अविनाश तायडे, (मेहकर), विजय दळवी,b(लोणार), जगदीश नरवाडे, (लोणार), जगन अवचार (साखरखेर्डा), सचिन खंडारे (शिंदी), प्रशांतभैय्या डोंगरदिवे, (पत्रकार,चिखली) संजय निकाळजे,(चिखली), साहेबराव इंगोले,(औ. बाद), माणिकराव गवई,(बुलडाणा ),स्वप्नील साखरे (पिं. सोनारा, किसन पिसे (चिखली) आदी कवींनी विविध विषयांवर आधारीत आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
प्रा. बी.ए. खरात,(अध्यक्ष,अक्षर साधना साहित्य संघ,चिखली) मा. भारत जाधव,(उपाध्यक्ष,अक्षर साधना साहित्य संघ,चिखली), मा. हि. रा. गवई,(सचिव,अक्षर साधना साहित्य संघ,चिखली) मा. प्रशांतकुमार डोंगरदिवे, (कोषाध्यक्ष,अक्षर साधना साहित्य संघ,चिखली) प्रवीणकुमार काकडे (प्रसिद्धी प्रमुख,अक्षर साधना साहित्य संघ,चिखली) मा. प्रवीण डोंगरदिवे,(सहसचिव अक्षर साधना साहित्य संघ,चिखली), मा.सौ दीक्षा प्र. डोंगरदिवे,(मेरा बु।),अँड. बाळासाहेब वानखेडे तसेच इतर मान्यवरांनी आपापल्या रचना सादर केल्या. उपस्थित तमाम मान्यवर पाहुण्यांचे तसेच सर्वच कवींचे संमान चिंह, प्रशस्तीपत्र, बुके आणि पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आले.
साहित्य संमेलनाचे बहारदार असे उत्कृष्ट संचालन प्रशांत कुमार डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन एजाज़ खान एजाज़ यांनी केले. सदर कवी संमेलनामध्ये सुंदर रांगोळी रेखाटण्याचे काम कु.स्नेहल गवई व कु.क्रांती गवई यांनी केले. सर्व सदस्य व पदाधिकारी अक्षर साधना साहित्य संघ,चिखली यांनी कवीसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेऊन साहित्य संमेलन यशस्वी केले .