जळगाव जामोद शहरातील ब्रिटिश कालीन जिल्हा परिषदेची माजी शासकीय होणार ईतीहास जमा
सागरकुमार झनके
जळगाव जा : कधीकाळी अनेक सुवर्ण क्षणांची साक्षिदार राहिलेली जळगाव जामोद शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जिल्हा परिषदेची माजी शासकीय शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर असून,लोकप्रतीनीधीसह स्थानिक प्रशासणाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.शाळेची रचणा ब्रिटिश राजवटीत असून शाळेची स्थापना १८६२ साली झाली आहे.याच शाळेने अनेक विद्यार्थी घडवले.अनेक ऐतिहासिक घटणा या शाळेने पाहल्या असतील. स्वातंत्र लढ्याची साक्ष ठरलेल्या या शाळेने अनेक चढ उतार याची देही याची डोळा पाहिले असतील.पण आज मात्र ही शाळा अडगळीत पडली आहे.शाळेच्या समोरच मुख्य रस्ता आहे.जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची नजर शाळेकडे जाते.अगदी हाकेच्या अंतरावर नगर पालीकेची ईमारत आहे.बाजुलाच दि.न्यु ई् हायस्कूल आहे.त्याच परिसत अगदी जवळच तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन, पंचायत समितीचे कार्यालय आहे.
सामाजिक बांधीलकी चा ऐक भाग म्हणून नेहमिच सामाजीक प्रश्नाबाबत आग्रही भूमिका धरणारे तालुक्यातील एक जागृत नागरीक म्हणून सुपरिचीत असलेले झाडेगाव येथील प्रशांत तायडे यांनी पमहाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री 28 मे ला जळगाव जामोद ला आले आसता,या शाळेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेवून निवेदन दिले. याच शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन, संचालन आणि तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.पुर्वीपासुनच या मैदानाचा वापर विविध शासकीय कार्यक्रमासाठी होतो.पण आजरोजी या शाळेचे मैदान संकटात सापडले आहे.या शाळेच्या मैदानात शासकीय कार्यालये थाटले आहेत.तसेच अनेक वाईट बाबीसाठी सुद्धा या मैदानाचा वापर होतो.ऐवढेच नाही तर ब्रिटिश कालीन असलेली शाळेची ही प्रशस्त ईमारत शेवटची घटका मोजत आहे.ईमारतीला बऱ्याच ठिकाणी तडे गेले असून बहुतांश भाग जमिनदोस्त झाला आहे.या ऐतिहासिक ईमारतीकडे स्थानिक प्रशासनासह लोकप्रतीनीधीनी सुद्धा पाठ फिरवली आहे.त्यामुळे कधीकाळी सर्वाच्या जिव्हाळ्याची बोलकी असलेली जिल्हा परिषदेची माजी शासकीय शाळा आता मात्र अबोल झाली असून शाळेने मौनव्रत धारण केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या शाळेची ऐवढी दुरावस्था होत असतांना याकडे स्थानिक प्रशासणाचे,लोकप्रतीनीधींचे लक्ष नसणे मोठी शोकांतीका आहे.शैक्षणिक दृष्या हा मोठा जिव्हाळ्याचा विषय असतांना याकडे साफ दुर्लक्ष करणे हा सुद्धा चींतेचा विषय आहे.त्यामुळे भविष्यात शाळा बंद पाडून त्या जागेचा उपयोग काही वेगळ्या कारणासाठी तर होणार नाही ? अशी चर्चा सुद्धा जनसामाण्यामध्ये ऐकायला मिळत आहे।
असे असले तरी,जिल्हा परिषदेच्या या माजी शासकीय शाळेचे आणि समोरिल मैदानाचे जतन झाले पाहिजे, व पुन्हा ऐकदा शाळेला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे.अनेक सुवर्ण क्षणांची साक्षिदार ठरलेल्या या शाळेचा कायापालट होवून,पुन्हा ऐकदा नवचैतण्याच्या पहाटेची सोनेर किणार या शाळेला लाभो हीच जनसामान्यांची ईच्छा आहे.ऐवढे मात्र खरे !