Breaking News
recent

मलकापुर नगर परिषदेचा अनागोंदी कारभार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे कडून मुख्याधिकार्यांची कान उघाडणी

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

         

    मलकापुर नगर परिषदेचा कारभार हा गत काही वर्षांपासून कसा सुरू आहे हे मलकापुर वासीयांना चांगलेच माहीत आहे. मलकापुर नगर परिषद ही जनतेच्या सेवे सुविधेसाठी नव्हे तर फक्त निवडून गेलेल्या सदस्यांच्या व अधिकारी कर्मचार्यांच्या आर्थिक सेवेसाठी असल्याचे चित्र मलकापुर वासीयांना अनुभवायला मिळत आहे. मलकापुर नगर परिषद ही नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते, पाणी पुरवठा असो, साफ सफाई असो कि कुठल्याही शासकीय योजना असोत या मुख्य व प्रमुख गरजाही नगर परिषदेद्वारे कधीही व्यवस्थित राबविण्यात येत नाही. वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात. परंतु निगरघट्ट शासकीय अधिकारी यंत्रणा राजकीय नेत्यांना हाताशी धरून दबाव तंत्राचा वापर करुन समाजसेवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात. जनतेने निवडून दिलेले नगरसेवक ही आपल्या आर्थिक स्वहितासाठी या अधिकारीयंत्रणेची साथ देतात. 

   असाच काहीसा प्रकार मलकापूर नगर परिषदे मधे सुरु असल्याने समाजसेवक, पत्रकार, प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी सर्व व्यथा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे आपल्या दौर्यादरम्यान शेगांव येथे आले असता त्यांचेकडे मांडली. कर्तव्यदक्ष मंत्री बच्चुभाऊ यांनी तात्काळ विषयाचे गांभीर्य ओळखुन मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांना भ्रमणध्वनी वरुन याबाबत विचारणा करत कर्तव्य कसुरतेबाबत चांगलीच कान उघाडणी करत चार दिवसांचा अल्टिमेटम दिला व चार दिवसांनंतर पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

   यावेळी मुख्याधिकारी यांचे द्वारे सांगण्यात आले की साफ सफाई, नाली सफाई करण्यात आली आहे परंतु असे होत असल्याचे कोठेही आढळून आलेले नाही. आता तरी मलकापूर नगर पालिकेद्वारे युध्द पातळीवर सफाई करण्यात येईल की मुख्याधिकार्यांना राज्यमंत्र्यांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल हे येणारा काळच सांगेल. यावेळी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अजय टप, पत्रकार गौरव खरे, करणसिंग सिरसवाल,अपरेश तुपकरी,नागेश सुरंगे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered by Blogger.