विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना बियाण्यांच्या प्रकाराबद्दल मार्गदर्शन
मेहकर (प्रतिनिधी)
तालुक्यातील शेलगाव काकडे येथे खरिप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकरी आता त्यांचे सर्व मशागती चे काम व बी बियाणे खरेदी करत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी बियाणांच्या प्रकारांची ओळख कशी करावी, कोणते बियाणे हे पेरणी साठी योग्य आहे, कोणते बियाणे किती शुध्द असते याची सर्व माहिती शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम सन २०२२-२३ या अनुषंगाने शेतकऱ्यांना संबोधित केले.
यावेळी बियाणांच्या पिशवीवर असणारी टॅग यांच्या रंगावरून वर्गीकरण कसे करतात तसेच बियाणांच्या पाच विभागणी करून त्याची शुध्दता, उपयोग, आकार याविषयी उपस्थित शेतकरी वसंतराव काकडे, एकनाथ गोडे, कान्होबा काकडे व गावकऱ्यांना महाविद्यालयाचे विद्यार्थी अविष्कार जगताप, कुणाल भिवटे, पुरुषोत्तम डोफेकर यांनी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष कालवे, प्रा. मनोज खोडके, प्रा. समाधान जाधव आणि उपक्रमाचे अधिकारी प्रा. जी.के. ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.