Breaking News
recent

विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली पेरणी आधी बीजप्रक्रिया बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


सिंदखेडराजा प्रतिनिधी

 पेरणी आधी बीजप्रक्रिया महत्वाची पाऊस झाल्या नंतर आता पेरणी ला सुरुवात झाली आहे, पण पेरणी करताना जिवाणूंची  बीज प्रक्रियाचे काय महत्त्व आहे यांच्या बद्दलची माहिती शेतकऱ्यांना विवेकानंद कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी दिली.

ट्रायकोडरमा रायजोबियम स्पुरद विरघळणारे जिवाणू यांची बीज प्रक्रियाचे फायदे ट्रायकोडरमा चा उपयोग केल्याने बुरशीजन्य रोगांपासून बचाव होत असतो ही बुरशी परजीवी असून ते दुसऱ्या बुरशीला  नष्ट करते. रायजोबियम  हे वातावरणातील नत्र शोषुन घेते आणि पिकास उपलब्ध करून देते, तर स्पूरद विरघळणारे जिवाणू जमिनीतील स्पुरद पिकास उपलब्ध करून देते 

या बद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषी महाविद्यालयातील कृषिरत्न ग्रुपचे विद्यार्थी अच्युत नाफडे व हर्षल रहांगडाले यांनी माहिती दिली. यासाठी त्यांना डॉ सुभाष कालवे, प्रा. मनोज खोडके, प्रा. गजानन ठाकरे, प्रा.समाधान जाधव , प्रा.विवेक हमाने यांचे मार्गदर्शन लाभले.

Powered by Blogger.