चांदुर बिस्वा मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात यावे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
नांदुरा प्रतिनिधी
चांदुर बिस्वा मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी श्री अभय संतोषराव पाटील अध्यक्ष अंबिका फाऊंडेशन चांदुर बिस्वा यांनी निवेदनात देण्याचे निवेदनात नमूद केले आहे
चांदुर बिस्वा मंडळामध्ये १० ते १५ गावे येत असून शेतकऱ्यांना शेती हाच एक मुख्य व्यवसाय आहे.त्यामुळे शेतीतील पीक काढून त्यांना उदरनिर्वाह करतात निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी कधी जास्त पाऊस पडत असल्यामुळे पावसाच्या पाण्याची नोंद घेतल्या जात नाही त्यामुळे नुकसान जाहीर करण्याकरिता शासकीय नोंद करण्याकरिता अडचण येते त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे करीत चांदुर बिस्वा ग्रुप चांदुर बिस्वा येथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात यावे पर्जन्याची नोंद तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत ठेवावी.असे निवेदनात म्हटले आहे.