मलकापूर तालुक्यातील देबधाबा येथे मुसळधार पाऊस.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापुर तालुक्यातील देबधाबा येथे रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसला . पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असल्याने ग्रामस्थ आनंदी होते पण काही मिनिटांतच पाऊस इतका पडला की पुर्ण गाव जलमय झाले. 20-25 घरांमध्ये तर कमरेपर्यंत पाणी साचल्याने घरातील धनधान्य,पेरणीचे दिवस असल्याने शेतकर्यांनी आणलेले खते बि बियाणे भिजून वाहून गेले. कित्येक घरातील सामानाची नासाडी झाली.
हे पावसाचे पाणी गावात व घरात घुसण्यासाठी ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.त्याचे कारण असे की एरवी विकासाच्या गप्पा मारणार्या ग्रामपंचायत कडून जेथे आवश्यक आहे तेथिल कामे न करता अनावश्यक ठिकाणी व अनावश्यक कामांवर खर्च करत आहे. रस्त्यांपेक्षा नाल्या उंच असल्याने रस्त्यावरील पाणी नाल्यांमध्ये न जाता घरामध्ये घुसत आहे.या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण हा प्रश्न नुकसानग्रस्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
कुठलेही नियोजनात्मक कामे न करता थातूरमातूर कामे करुन विकास केल्याचा ढोल वाजवत आहे. परंतु ग्रामपंचायतीचा कारभार निसर्गाने समोर आणला आहे. आता तरी ग्रामपंचायत योग्य कामे करेल काय की असेच नागरिकांच्या घरात पाणी घुसेल असा प्रश्न गावकरी विचारत आहे.