Breaking News
recent

वीज पडून दोन मजुरांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा



मतीन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर :


  तालुक्यातील पळशी झाशी गावात पळशी शिवरात २३ जून रोजी दुपारी २ वाजता वीज पडून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाल्याची दुखद घटना घडली आहे.प्राप्त माहितीनुसार, पळशी येथील महिला शेतकरी सुशीला रमेश हेलगे यांच्या शेतात विहिरीचे खोलीकरणाचे काम सुरु होते. आज दुपारी २ वाजता सुमारास विजेच्या कडकडाट व पाऊस सुरू झाला. काम करणारे मजूर रवी संजय भालतडक व संजय उत्तमराव मारोडे, आणी मंगेश मनोहर बारब्दे, नंदकिशोर मधुकर मारोडे चौघेही रा.पळशी ता.संग्रामपुर हे विजेच्या आवाज एकून घरी जाऊ लागले.

     मजूर घरी जात असताना त्यांचे जेवणाचे टिफीन निंबाच्या झाडाला टांगलेले आहे हे त्यांचे लक्षात आलं, ते टिफीन आणण्यासाठी निंबाच्या झाडाजवळ गेले एवढ्यातच विजेचा कडकडाट होवून निंबाचे झाडावर वीज पडून यामध्ये रवी संजय भालतडक (वय ३२) व संजय उत्तमराव मारोडे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगेश मनोहर बारब्दे (वय ४०) व नंदकिशोर मधुकर मारोडे (वय ३९) हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती गावातील नागरिकांना प्राप्त होताच त्यांनी जखमींना प्रथम संग्रामपूर प्रा,आ.मध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेगाव येथे रेफर केले. सदर घटनेचा संग्रामपूर महसुल विभागाचे कर्मचारी व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला, या दुखद घटने मुळे पळशी गावात व संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

    दोन्ही मृतकाचे वरवट (बकाल) ग्रामीण रुग्णालयात शवविश्चेदन करण्यात आले नंतर प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देवून त्यांचेवर पळशी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू मजूरांचे कुटुंबीयांना आपत्ती अंतर्गत मदतीची रक्कम देण्याची मागणी गावचे सरपंच अभयसिंह मारोडे प्रशासनाकडे करत आहेत.


Powered by Blogger.