Breaking News
recent

देवधाबा येथील पाणीटंचाई कायम

 


प्रतिनिधी नागेश सुरंगे

    देवधाबा गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा १५ ते २० दिवस उलटूनही न झाल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र देवधाबा येथे पुन्हा निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला वर्ग सतप्त होत आहे.

  देवधाबा येथे विवरा २२ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा देयक भरणा न केल्याने खंडित केला आहे. त्यामुळे २२ गाव प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा बंद पडला. देवधाबा ग्रामपंचायतीची गेल्या महिन्यापर्यंत स्वतःची स्वतंत्र पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नाही.

    गेल्या महिन्यात देवधाबा येथे केलेल्या बोअरवेलला बऱ्यापैकी पाणी लागल्याने टंचाईतून मुक्तता होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. महिना उलटूनही ग्रामपंचायत प्रशासन व   लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे मोटारपंप, पाईपलाईन टाकणे, दुरुस्ती, नाही. विद्युत कनेक्शन व इतर किरकोळ कामे अद्यापही झालेली नाहीत. त्यामुळे उशिरा पाणी असूनसुद्धा ते मिळत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.


Powered by Blogger.