राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन अग्निपथ योजनेचा जाहिर निषेध
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर:
केंद्रातिल भाजप सरकारने ठेकेदारी पद्धतिने सैन्य भरती करणार्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणार्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचा व माजी सैनिक संघटनेने जाहिर निषेध व्यक्त केले. २० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व माजी सैनिक संघटनेने संग्रामपुर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमुद आहे कि अग्निपथ योजने अंतर्गत एक सैनिक केवळ चार वर्ष सैन्यात सेवा करुन बाकिच्या जिवनात पुढे भविष्यात काय करणार या बाबत विचार न करता चुकिचा निर्णय घेतला असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, माजी सैनिक, सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येने हजर राहुन देशातिल आणि महाराष्ट्रातिल युवकांच्या भविष्यासाठी निवेदनाचा विचार करावा अशी मागणी केली आहे.
निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय मारोडे, तालुका कार्याध्यक्ष तथा माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष अरुण निंबोळकार, सोशल मिडीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दुर्गासिंह सोळंके, आशिष बकाल, चेतन बकाल, सतीष वानखडे, श्रीकांत झाल्टे व युवक वर्ग उपस्थित होते.