Breaking News
recent

जळगाव तालुक्यातील तीनही धरणे तुडुंब, सतर्कतेचा इशारा

सातपुडा पर्वताने पांघरली हिरवी चादर

प्रतिनिधी नागेश सुरंगे

     जळगाव जामोद जळगाव तालुक्यातील राजुरा, गोडाडा व धानोरा ही तीनही धरणे शंभर टक्के भरली असून या धरणांमधून सध्या अल्प प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना लघु पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सातपुडा पर्वताने हिरवी चादर पांघरली असून पर्यटकांना खुणावत असल्याने सातपुडा पर्वतराजीत निसर्ग सानिध्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.तालुक्यातील राजुरा धरणाची जलाशय पातळी १११.४५ दशलक्ष घनमीटर, गोडाळा धरणाची ९७.२० तर धानोरा धरणाची १३७.५० दशलक्ष घनमीटर आहे. सद्यस्थितीत ही धरणे शंभर टक्के भरली असून विसर्ग या धरणातून सुरू आहे.

     या धरणावरील जलसाठा पाहण्यासाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हौशी नागरिकांची मोठी गर्दी या धरणांवर दिसत आहे. जळगाव तालुक्यात एकूण पाच महसूल मंडळे आहेत. जळगाव, वडशिंगी, आसलगाव, पिंपळगाव व जामोद या पाच महसूल मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी २५ जुलैपर्यंत २६८.५ मिलिमीटर आहे. जळगाव महसूल मंडळात ५४४ मिलिमीटर पाऊस पडला. मागील वर्षी तालुक्यात २५ जुलैपर्यंत फक्त १७८ चौकट तालुक्यात २६८ मी. पाऊस मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी १० मिलिमीटर पाऊस हा जास्त आहे. वर्षअखेर ७०७ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास सध्या ३८ टक्के पाऊस झाला आहे.


Powered by Blogger.