Breaking News
recent

दोनशे फुट शेत रस्ता जातीयवाद्याने रोखल्यामुळे सात एकर शेत पडले पडीत.



बुलडाणा दि. २३ जुलै ( प्रतिनिधी)

     फुले शाहू-आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात सरकारी रस्त्यावरून दोनशे फुट रस्ता जातीयवाद्याने रोखल्यामुळे अनुसूचित जातीच्या रजनी कडुबा वानखडे या शेतकऱ्याचे सात एकर शेत पडीत राहीले. ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की थार ( बरदापुर )वरून कासरखेडला रस्ता जातो ह्या रस्त्याला लागून माणिकराव परशराम नवघरे यांचे शेत आहे. ह्या शेताला लागूनच दक्षिणेस दोनशे फुट अंतरावर अनुसूचित जातीचे रंजना कडुबा वानखडे यांचे गट नं २४६ व २४७ मधील सात एकर शेत जमिन आहे.मागील १५ वर्षापासून ते शेती करतात.मागील हंगामात  त्यांनी सोयाबीन व हरबाऱ्याचे सात लाख रुपयांचे उत्पन्न काढले होते.

    शेती,घर व थार येथे त्यांची पिठाची चक्की आहे.मागील काही दिवसात पेन टाकळी धरण झाल्यामुळे कसारखेड गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे त्यांच्या शेताला लागून दक्षिणेस शेत असलेल्या शेतकऱ्यांना कसारखेड वरून त्यांच्या शेतात जाण्यास रस्ता त्यांना उपलब्ध झाला . त्यामुळे त्यांनी थार कडुन येणाऱ्या रस्त्याने जाणेयेणे बंद केले आहे  .ह्याचाच माणिकराव  नवघरे यांनी फायदा घेऊन अनुसूचित जातीचे शेतकरी रंजना वानखडे यांचा शेत रस्ता बंद केला.त्यामुळे रंजना  वानखडे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी  मेहकर यांच्याकडे  वहिवाटीचा रस्ता अडविला असुन तो रस्ता देण्याबाबत अपिल केले.पूर्वीचा शेत रस्ता रेकाॅर्डवर असल्याचे तलाठी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेत रस्ता होता असे शपथपत्र दाखल केले. परंतु तलाठी व नायब तहसीलदार यांनी स्थळ निरीक्षण अहवालात गाड्याची चाकोरी किंवा रस्त्याच्या खुणा नसल्याचा अहवाल दिला .वास्तविक  माणिकराव नवघरे यांनी पहिले रस्ता खोदुन काढला व नंतर त्या रस्त्यावर दगडाचा बांध घातलेला आहे. त्यामुळे गाडीची चाकोरी किंवा खुना अशाप्रकारे नष्ट केल्या. 



    वहिवाटीचा रस्ता रेकाॅर्डवर असुन व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लेखी जबाब दिल्यानंतरही तलाठी व नायब तहसीलदार यांच्या स्थळ निरीक्षण अहवालावर तहसीलदार यांनी अर्जदार यांचा अर्ज फेटाळून लावला. तसेच  उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या कडे अपिल केले असता त्यांनीही तहसीलदार मेहकर यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला.अशाप्रकारे कायद्याची लढाई लढत पीडीत शेतकऱ्याने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना  शेत रस्ता देण्याबाबत पत्र दिले आहे.परंतु जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा कडुन कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.न्याय मिळविण्यासाठी सदर शेतकरी दि.२५ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणास बसणार  आहे.

Powered by Blogger.