Breaking News
recent

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब- प्रा विजय पुंडे.



मलकापूर 

      यावर्षी देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळक, अन्नाभाऊ साठे अशा अनेकांनी बहुमोल योगदान दिलेले आहे. त्यामुळेच आपण हे स्वातंत्र्य उपभोगतोय देशाला पुढे घेऊन जाणे ही आपण सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन प्रा विजय पुंडे यांनी केले. येथिल गोविंद विष्णू महाजन विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक पुण्यतीथी व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

    सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक संदिप वैष्णव तर मार्गदर्शक म्हणून प्रा. विजय पुंडे, मराठी विषय शिक्षिका शितल चौधरी उपस्थित होते. 

     सुरूवातीला भारतमाता, लोकशाहिर अन्नाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अन्नाभाऊ साठे व लोकमान्य यांच्या विचारांना उजाळा देणारी भाषणे व गिते सादर केले. शितल चौधरी यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

    अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक संदिप वैष्णव यांनी अन्नाभाऊ साठे यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांना सांगुन आपणास मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. सीमा वराडे यांनी केले. संचलन वर्ग १० च्या कुर्षदा कांडेलकर, कु. कोमल बोपले, कु. मयुरी ईंगळे, आभार प्रदर्शन कु. सिद्धी कस्तुरे हीने केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थांनी व शिक्षकय-शिक्षीका उपस्थित होते.

Powered by Blogger.