Breaking News
recent

रब्बी हंगामात पीक विमा योजनेत शेतकऱ्यानी सहभागी व्हावे- .भोला राठोड संपर्क प्रमुख शिवसेना(उ.बा. ठाकरे)



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

प्रधानमंत्री पीक विमा आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनाक 26 जून 2023 रोजी नुसार राज्यात सर्वसमावेसक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णया नुसार राज्यातील शेतकऱ्याना प्रती अर्ज १/ रुपया भरून पीक विमा नोंदणी करता येणार आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना ईचीक आहे. सन २०२३-२४ या चालू रब्बी  हंगामात राज्यातील शेतकाऱ्यासाठी प्रति अर्ज १/ रुपया भरून पीक विमा भरण्याची सर्वसमावेसक योजना राज्यात शासनाने सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंजा मानोरा संपर्क प्रमुख मा.भोला राठोड शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.   

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकाऱ्यासाठी आधार कार्ड,पीक पेरा अहवाल, ७/१२, ८ अ ,बँक पासबूक ,मोबाइल क्रमांक इत्यादी दस्तावेजची आवश्यक आहे. या योजनेत पुढील बाबीचा समावेश करण्यात आले आहे. पीक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत नसर्गिक ,आग ,वीज कोसळणे ,गारपीठ ,चकरी वादळ ,पूर परिस्थिती,क्षेत्र जलमय होणे ,दुष्काळ, पावसातील खंड ,कीड व रोग ,इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी येणारी घट ,स्थानिक नैसर्गिक कारणामुळे होणारे उत्पणात आपतीमुळे पिकाचे होणारे काडणी पश्चयत १४ दिवसापर्यंत नुकसान या बाबीचा समावेश आहे.या योजनेतील  गहू ,हरबरा(चणा) यासारख्या पिकाचा समावेश आहे.  

 सन २०२३-२४ या खरीप हंगामात दुष्काळ परिस्थिति निर्माण झाल्यामुळे सर्व पिके धोक्यात आली आहे.विमा कंपनीनी मंजूर अग्रिम 25% विमा शेतकरीच्या खात्यात जमा करावे.शेतकऱ्याना रब्बी पेरणी करिता मदत होईल. रब्बी हंगामात गहू,हरबरा पेरणी झाल्यास शेतकाऱ्याना पेरणीसाठी विमा संरक्षण लाभणार आहे. शेतकऱ्यानी रब्बी हंगामातील पिकाचे प्रधानमंत्री पीक विमा भरावे.तरी शेतकऱ्यानी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. शेवटच्या तारखेला संकेतस्थळा वर तान आल्यास चालणार नाही. अशा कारणामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यानी त्वरित पीक विमा भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन.कारंजा मानोरा संपर्क प्रमुख मा.भोला राठोड शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.


Powered by Blogger.