नांदेड: पावसाळ्याआधीच नागरिकांच्या जीवितास धोका.
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर माजवला असून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असून, नागरिक हे पावसाळ्याआधीच येणाऱ्या पाण्याचा अंदाज आला बळी पडतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बंधारे, नाले यांचे व्यवस्थितरित्या खोलीकरण झाले नसल्यामुळे पाणी हे रस्त्यावर पुलावरून वाहताना दिसत आहे.