Breaking News
recent

नियम व अटी मध्ये बसणाऱ्या सर्व नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा - गणेश कदम

 



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम. 

प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) ही योजना सर्व भारतामध्ये राबवली जात आहे. आणि या योजनेचा उद्देश गरजू व गरीब नागरिकांना पक्के घर असायला पाहिजे. आणि माणसाच्या गरजू वस्तू अन्न, पाणी, वस्त्र, शिक्षण आणि निवारा त्यातलाच एक भाग म्हणजे घरकुल योजना शासनाचे असे धोरण आहे की, गरीब व गरजू लोकांना आणि जे लोक प्रधानमंत्री आवास योजना च्या नियम व अटींमध्ये बसतात त्यांना 2025 पर्यंत  पक्के घर मिळायला पाहिजे.

 आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत घरकुल योजनेमध्ये नाव नोंदवले नाहीत अशा लोकांनी स्वतःच्या मोबाईलवरून घरकुल योजनेचा ॲप मधून घरकुलचा सर्वे पूर्ण करू शकता. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र  लाभार्थ्याचा आधार कार्ड, बँकेचे पासबुक, जॉब कार्ड, शासनाने घरकुल योजनेत नाव नोंदविण्यासाठी 31 मे 2025 पर्यंत ठेवलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी या घरकुल योजनेमध्ये नाव नोंदवून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा.

Powered by Blogger.