Breaking News
recent

जलजीवन मिशन योजनेंतर्गत मिळणार २१० कोटी रुपये १४० गाव रिट्रो फिटिंग पुरवठा योजना मंजूर



जळगाव जामोद जलजीवन मिशन योजनेंतर्गत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व गावांकरिता नवीन १४० गाव पाणी पुरवठा योजनेला २६ एप्रिल रोजी प्रशासकीय मंजुरात देण्यात आली. या २१० कोटींच्या पाणी पुरवठा योजना मंजुरीचा शासन निर्णय राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वीकारला. या योजनेमुळे या दोन तालुक्यातील सर्व नागरिकांना ५५ लिटर दरडोई या प्रमाणे पाणी मिळणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून या कामाला सुरुवात होणार आहे, असे आ.डॉ. कुठे यांनी सांगितले. निधी उपलब्ध होताच या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.


■ ८ राजुरासह ८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १४ कोटी रुपये निधीची पाणी पुरवठा योजना असून, त्यात खालील गावांचा समावेश आहे. नांगरटी, उमापूर, चारबन, गारपेठ, राजुरा, हनवतखेड, रायपूर, शेखगणी, राजुरा फाटा या दोन योजनेची निविदा प्रक्रिया पार पडली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.


■आदिवासी बांधवांनासुद्धा मिळणार पिण्याचे पाणी जलजीवन मिशन या प्रकल्पांतर्गत तांत्रिक कारणांमुळे १४० गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट न करता आलेल्या जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या डोंगराळ गावांकरिता गोराडा व राजुरा धरणातून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहेत.


■ निमखेडी फाट्यासह ९ गावांचा समावेश १३ कोटी रुपये निधीची पाणी पुरवठा योजना असून, त्यात खालील गावांचा समावेश आहे. निमखेडी फाटा, जुनापाणी, वडपाणी, गोरक्षनाथ, ईसाई, बांडापिपळ, निमखेडी, मेढामारीकहुपट्टा, डुक्करदरी, निमखेडी फाटा,

Powered by Blogger.