Breaking News
recent

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात दरवर्षी छत्तीस साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज - डॉ श्रीपाल सबनीस

 


मंठा प्रतिनिधी (शिवाजी खंदारे) 


    डिजिटल युगात साहित्य जिवंत ठेवले हीच खरी साहित्याची ताकद असल्याच मत उदघाटक ना.राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यातील मंठा येथे आयोजित 29 व्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलात व्यक्त केले,

    पुरोगामी महाराष्ट्र म्हणणार्‍या महाराष्ट्रत आज नाना प्रकारचे वेगवेगळे महाराष्ट्राला अनंत करण्याचे साहित्य संमेलने सध्या सुरू आहेत परंतु मंठा सारख्या ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन घेण्याचं धाडस करून ते यशस्वी केल्या बद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांनी मुख्य संयोजक अनिल उद्धवराव खंदारे यांच तोंड भरून कौतुक केले. 

     मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन झाले. याप्रसंगी आपले विचार मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, साहित्यिक हा नवसर्जनाचा मानबिंदू असून नवसमाज निर्मिती करतानाच समाजातील जातीयवाद व द्वेषभावना नष्ट करण्याची ताकद साहित्यिकांच्या लेखणीत असते व निश्चितपणाने समाजकारण, राजकारण व सांस्कृतिकक्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम नवोदित साहित्यिकांनी करावे असे आव्हान केले.

   यावेळी मंचावर संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, स्वागताध्यक्ष इंजि. विजय घोगरे, संमेलनाचे निमंत्रक ए. जे. पाटील बोराडे, ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे, युवा नेते कपील आकात आदी मान्यवर उपस्थित होते.

      भव्यदिव्य अशा नवोदित मराठी साहित्य संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल होती, तीन सत्रांत कविसंमेलन तसेच तीन सत्रांत विविध विषयांवरील परिसंवादामध्ये विचारवंतांनी सकस विचार मांडले. तृतीय सत्रांत निमंत्रित नवोदित मराठी कवींचे दोन सत्र पार पडले यावेळी कवी व कथाकार यांनी दर्जेदार कवीता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.दोन्ही दिवस मोठया संख्येने उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुख्य संयोजक अनिल खंदारे यांनी तर आभारप्रदर्शन संयोजक भरत मानकर यांनी केले

Powered by Blogger.