Breaking News
recent

जन्म,ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण आदी कारणाने बुध्दधम्मात वैशाख पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण ! - अशांतभाई वानखेडे



मलकापूर 

     संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महकारुणिक तथागत भ.गौतम बुद्ध यांचा जन्म २५६५ वर्षापूर्वी वैशाख पौर्णिमेला झाला.वैशाखी पौर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण घडून आल्याने या पौर्णिमेचे महत्त्व बुध्दधम्मात अनन्यसाधारण असून संपूर्ण जगात बुध्दजयंती साजरी केली जात असल्याचे प्रतिपादन "समतेचे निळे वादळ" या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी   बन्सिलाल नगर येथील बुध्दजयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

    यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ.जी.ओ.जाधव यांनी बुध्दधम्मात पंचशिलेचे महत्त्व विषद करीत समयोचीत मार्गदर्शन केले. विजयकुमार तायडे,दिलीप इंगळे,शिवाबाप्पू देशमुख, ग्रा. स. बंडूभाऊ बोंबटकार,दिलीपभाऊ इंगळे, पुंडलिक बाभूळकर आदींची विचारपीठावर उपस्थिती  होती.

    तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन बोधाचार्य श्री आर.एम.सुर्यवंशी यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध,धम्म,संघ वंदनेसह पुजाविधी संपन्न केला.  बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणम गच्छामि, संघं शरणं गच्छामी च्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय धुरंदर, चंद्रमोहन निकम, महादेव पैठणे, दिपक पैठणे, सुरेश मगर, गौतम सूर्यवंशी, रविंद्र बाभुळकर, विक्रम राणे, लक्ष्मण वानखडे, अजय गायकवाड, सिद्धार्थ वानखडे, मेजर सिद्धार्थ दांडगे, प्रमोद वानखडे, मेजर माणिक खराटे आदींनी प्रयत्न केले.

     सदर प्रसंगी सर्वश्री रमेश वानखडे, पद्माकर धाडे, मेजर जाधव, मेजर विजय वानखडे, किशोर पाटील, राहुल सनानसे, स्वप्नील शिंगोटे, वैभव सातव ,राहुल जगताप, चिन्मय कुलकर्णी, प्रसाद सोनोणे, मंगेश पडोळकर, प्रतीक पाठक, मुकेश जगताप, राहुल कचाले, अमित भोयर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान धुरंधर( वरखेड सावळी) तर आभार प्रदर्शन गौतम सूर्यवंशी यांनी केले सर्व उपस्थितांना खिर दानाने बुद्धजयंतीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Powered by Blogger.