आरक्षित प्रवर्गातील उमेदवार सामान्य श्रेणीतून पद मिळवण्यास हक्कदार'
नवी दिल्ली: खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवाराच्या तुलनेत अधिक गुण मिळवणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार सामान्य श्रेणीतून जागा अथवा पद मिळवण्याचा हक्कदार आहे, असा निकाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. गुणवत्ता यादीत संबंधित उमेदवाराची योग्यता आणि स्थितीनूसार आरक्षित वर्गातील संबंधित उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागांवरून दावा करू शकतो, असे न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने स्पष्ट करीत उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला
या प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्युनल, जोधपूरने एक उमेदवाराकडून दाखल करण्यात आलेला अर्जाला परवानगी देत ओबीसी प्रवर्गातील संबंधित उमेदवार ज्याच्याकडे अधिक योग्यता आहे, त्याला सामान्य प्रवर्गातील जागेवर समायोजित करण्याची आवश्यकता आहे. परिणामस्वरूप ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित जागांना आरक्षित प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांच्या योग्यतेच्या आधारे भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाने ट्रिब्युनलच्या या आदेशाला आव्हान देणारी बीएसएनएलची रिट याचिकेला फेटाळली होती