शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी-शेतकरी रामचंद्र हिवाळे यांची मागणी
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी
काटी येथील शेतकरी रामचंद्र भिमराव हिवाळे यांनी रासायनिक खते मिळत नसल्यामुळे त्यांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे खताची मागणी केली आहे.
पावसाने दांडी मारल्या मुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. आता पिके खतावर आली असताना. मुख्यत: १०:२६:२६, १६:१६:१६ व डि.ए.पी हे रासायनिक खते शेतकऱ्यांना मिळत नाही. पिक कर्जासाठी शेतकऱ्याना बॅंकेत फेऱ्या माराव्या लागल्या. दुबार पेरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावी लागली व रानटी जनावरा पासून रात्रंदिवस पिकाचे संरक्षण करावे लागले. आणी आता रासायनिक खते भेटत नाही. एकीकडे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नेहमीच बि-बियाणे ,किटकनाशके व रासायनिक खते यांचा काळा बाजार होत असेल तर शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे कसे. शेतकरी चौही बाजूनी भरडला जात आहे. रासायनिक खते वेळेवर पिकांना न दिल्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होईल.
कृषी केंद्राच्या गोडाऊन मध्ये रायायनीक खते असुन ते शेतकऱ्यांना जास्त भावाने विक्री करत आहेत. व नेहमीच्याच ग्राहकांना खते देत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसल्यामुळें मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहमीच बि-बियाणे,किटकनाशके व रासायनिक खते यांचा काळा बाजार होत असेल तर शेतकऱ्यांनी शेती करावी कशी? शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाहीत तर कृषी विभाग करते तरी काय?
असा प्रश्न रामचंद्र हिवाळे यांनी निवेदनाद्वारे कृषी विभागाला केला आहे. कृषी केंद्रामध्ये रासायनिक खते असुन जे कृषी केंद्र चालक खताचा काळाबाजार करत आहे. त्याची चौकशी करून त्यांच्या वर कृषी विभागाने कडक कारवाई करावी. व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे रामचंद्र हिवाळे यांनी तहसील राजेंद्र सुरडकर यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.