Breaking News
recent

कोरोना महामारीनंतर मंठा तालुक्यातील तळणी परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी

मंठा: ता. प्र. शिवाजी खंदारे

     जांभरुण ईदगाह टेकडीवर कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा बकरी ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद-उल-अजह बकरी ईद निमित्तानं  ग्रामीण भागातील किर्ला,जांभरुण ,दहा, या गावातील मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवन एकत्र येतात आणि जांभरुण ईदगाह टेकडीवर नमाज अदा करतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीचं संकट होतं. त्यामुळे  ईदगाह मशिदी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुस्लिम बांधवांना साधेपणानंच कोरोना काळात ईद साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. 

   मात्र राज्यासह देशातील कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळालाय. यावेळी मुस्लिम बांधवांना सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. दोन वर्षानंतर जांभरुण ईदगाह टेकडीवर नमाज अदा करण्याची संधी मिळाल्याचं समाधानही यावेळी मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवलंय. अनेकजण आपल्या संपूर्ण कुटुंबासह जांभरुण ईदगाह टेकडीवर आले होते.

यावेळीमौलाना, सलीम खाॅ पठाण यांनी  बकरी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले. व दैनिक अहिल्याराज शी बोलतांना सांगितले की ईद-उल-अजह म्हणजेच बकरी ईद च्या दिवशी मुस्लिम समाजातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती बकरा घेण्याची असते, असे लोक बकऱ्याची कुरबानी देतात. प्रेषित पैगंबराच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. 

  कुरबानी केल्यानंतर त्यांचे तिन समान भाग करुन एक भाग स्वतः ठेवावा लागतो व दुसरा नातेवाईक आणि तिसरा भाग परिसरातील गोरगरिबांना वाटप करण्यात येतो. मुस्लिम समाजात कुरबानीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. असे मौलाना यांनी सांगितले यावेळी पोलीस नाईक, आर, एम, मुंढे उपस्थित होते.

Powered by Blogger.