Breaking News
recent

ई पिक पाहणी हस्तलिखित द्वारे करण्यात यावी-तहसीलदार यांना निवेदन

 


नांदुरा प्रतिनिधी

       हिंगणे गव्हाड ता.नांदूरा शासनाने २०२१ पासून पीक पाहणी कार्यक्रम हस्तलिखित नोंद करता स्वतःचा हाताने मोबाईल अँपद्वारे नोंदणी करण्याचे सांगितले आहे परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे त्यामुळे पूर्वी अशी पीक पाहणी पटवाऱ्याद्वारे हस्तलिखित होती तशी पुन्हा करण्यात यावी व मोबाईल अप्पद्वारे अँपद्वारे रद्द करण्यात यावी अशी  मागणी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

      सदर निवेदनात नमूद केले आहे की ई पिक पाहणी शेतकऱ्यांनकडून अँपद्वारे कारण्यात येते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनजवळ स्क्रिनटच मोबाईल नसल्यामुळे व अशिक्षीत शेतकरी असल्यामुळे ई पिक पाहणीची नोंद मोबाईलद्वारे करता येत नाही त्यामुळे दुष्काळी पिक विमा खरिपाची पिकपेऱ्याची शासनदरबारी शेतकऱ्यांची नोंद होत नाही व नाफडेद्वारे पीक पेरा नसल्यामुळे कमी भावाने माल विकावा लागतो त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतात २०२१ पासून ई पिकं नोंदणी चालु झाली असून ५०℅ शेतकर्यांनी नोंद केली असून ५०% शेतकरी नोंद पासून वंचित आहे त्यामुळे ई पिक पाहणी शासकीय कर्मचाऱ्यांनी करण्यात यावी किंवा हस्तलिखित नोंद तलाठ्याकडे करण्यात यावी असे म्हटले आहे

Powered by Blogger.