मनसेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिले निवेदन
प्रतिनिधी नागेश सुरंगे
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत झालेले भ्रष्टाचाराची चौकशी करावे असे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी साहेब पंचायत समिती ज.जा.शहरांमधील व काही तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा / खाजगी अनुदानित शाळा / ग्रामीण भागातील शाळा / तसेच जळगाव जा शहरांमधील शाळेमध्ये होत असलेले भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण सर्व शाळेची चौकशी करून मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर कडक कारवाई करावी कारण असे की शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ज. जा. शहर व तालुक्यामध्ये याच्यामध्य मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे शासनाचा जीआर प्रमाणे प्रति विद्यार्थी यांना वर्ग *1 ते 5 वी* या विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून धान्य तांदूळ 19 किलो 700 ग्रॅम 2) मुंगदाळ 4 किलो 500 ग्रॅम 3) वाटाणा 5 किलो 700 ग्रॅम तसेच वर्ग 6 ते 8 वी वर्गातील 1)तांदूळ 29 किलो 550 ग्रॅम 2)मूगदाळ 7 किलो 3)वटाणा 8 किलो 250 ग्रॅम इतका असून याची वाटप झाली नाही किंवा याची माहिती पालकांना दिली नाही असे दिसून येत आहे तसेच काही शाळेमध्ये अंदाजे मोजमाप काटा ऐवजी शाळेचे कर्मचाऱ्यांनी (टिपा) (बकेट) (शेहर)- याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंदाजे मोजमाप करून दिले आहे .
शासनाच्या जीआर अनुसार प्रत्येक शाळेमध्ये मोजमाप काटा असावा परंतु कोणत्याही शाळेमध्ये मोजमाप काटा नसल्याने शाळेचे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत धान्य वाटप कशाप्रकारे केले जातो हे पण कल्पना नाही या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून तसेच सादर प्रत्येक शाळेमधील विद्यार्थ्यांना पालकांना विचारपूस करून याची चौकशी करावी व दोषीवर कडक कारवाई करावी व उर्वरित उरलेला धान्य सादर विद्यार्थ्यांना देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशिक्षणावर राहील असे निवेदन मनसेचे तालुका अध्यक्ष राजू राऊत शहर अध्यक्ष नागेश भटकर शहर ,संघटक वैभव येणकर आनंद सपकाळ ,योगेश म्हसाळ, प्रमोद येऊल यावेळी उपस्थित