Breaking News
recent

वेळोवेळी होतो विद्युत पुरवठा खंडीत नागरिक त्रस्त


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    मलकापूर गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा हा वेळोवेळी जात असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. थोडाजरी पाऊस पडला किंवा पावसाची चिन्हे जरी दिसलीतरी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. शहराला होणारा विद्युत पुरवठा हा अनेक भागात दिवसातून ४ ते ५ वेळा केव्हाही जातो. अनेकदातर थोडाजरी पाऊस सुरू झाला किंवा वारा सुटला तरी विद्युत पुरवठा हा बंद करण्यात येतो. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक सरपटणारे प्राणीही बाहेर येतात. 

    अशावेळी विद्युत पुरवठा हा सुरळीत राहणे आवश्यक आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून पावसाला थोडी जरी सुरुवात झाली की विद्युत पुरवठा हा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली असता मेंन्टनन्सचे कारण सांगून त्यांच्याकडून हात झटकल्या जातात. मात्र मान्सूनपूर्व मेंन्टनन्सची कामे करणे आवश्यक होते. मात्र अजूनही मेन्टनन्सच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकवेळा तर थोड्या-थोड्या वेळाने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने अनेकांच्या घरातील उपकरणे खराब होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच रात्री-बेरात्री विद्युत जात असल्याने नागरिक वैतागले असून वीज वितरण कंपनीने वेळोवेळी खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 


Powered by Blogger.