Breaking News
recent

महावितरणाचा भोंगळ कारभार ! एकच कर्मचारी देत आहे तिन गावात सेवा

मतिन शेख,प्रतिनधी संग्रामपुर

        महावितरण अधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामळे तालुक्यातिल बावनबिर परिसरातिल नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.संध्या पावसाळ्याचे दिवस आसल्यामुळे बावनबिर परिसरात कुठेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली किंवा पाऊस पडणार असे वातावरण झाले तरी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे प्रकार बावनबिर गावात घडत आहे. रात्री १० वाजता सुमारास विज गेली परंतु काही भागात लाईन रात्रभर आलीच नाही.

    रात्री १:०० वाजता नागरिकांनी टुनकी उपकेंद्रावर जाऊन विचारपुस केली असता तिथे उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले. परंतु तिथे कोणताही कर्मचारी हजर नव्हता. हे बघता ऑपरेटरला विचारपुस केली असता त्याने नागरिकांना सांगितले कि मी अधिकारी ला फोनवर संपर्क साधन्याचा प्रयत्न केला परंतु अधिकारी व कर्मचारी चे मोबाईल नॉट रिचेबल येत होते.अशा गंभीर मुद्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍याकडून मात्र दुर्लक्ष होत आहे.तसेचबावनबिर,पंचाळा,पयसोळा या तिनही गावात एकच कर्मचारी असुन त्या कर्मचार्‍याला पण फार असा त्रास सहन करावा लागता आहे.

रात्री काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण? 


        असे नागरीकांचे म्हणने आहे.म्हणुन हा भोंगळ कारोभार थांबवा.व नेहमीसाठी एक कर्मचारी द्यावा अशी मागणी बावनबिर गावचे नागरीक शेख ईरफान, जोहेब काझी, स्वप्निल पाटिल, गणेश फुलकर, श्रीकांत आखुड, शेख इफराज, समिर शाह,बरकत खान,महावितरण अधिकारीशी करत आहेत.


Powered by Blogger.