Breaking News
recent

घिर्णी मलकापुर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी- ग्रामस्थांची मागणी

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

गेल्या आठ ते दहा दिवसापासुन पावसाने चांगलाच प्रभाव दाखविला आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. रस्त्याच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याच्या समस्या इत्यादी अश मध्येच घिर्णी ते पंचमुखी हनुमान रस्त्याची समस्या वाहन धारक, पायी वाटसुरु यांना भेडसावत आहे. घिर्णी ह्या गावाला तिर्थ क्षेत्रचा दर्जा प्राप्त झाला. 
    त्या अनुषंगानेच इंथ भविक भक्ताची वारकऱ्यांची मांदियाळी जमते मलकापुर शहरातुन अनेक ' श्री ' भक्त पायी वारी करतात. ह्या रोडला आत जागो जागी खड्डे पडले. पावसाळा असल्याने खड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन धारक व पायी वारकरी शाळेतील विद्यार्थी यांना अतोनात त्रास होतो. संबंधित अधिकारी व दमदार लोक प्रतिनिधी यांनी लक्ष देऊन कमीत कमी खड्डे तरी बुजवावीत अशी मागणी ' श्री ' भक्त व गावकरी करीत आहे.

Powered by Blogger.