कृउबासच्या जुन्या निर्णयानुसार निवडणुका घ्या काँग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
नुकतेच महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार स्थापन झाले असून. त्यांनी महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणाऱ्या निवडणूकी संदर्भात काही निर्णय घेतले.त्यामध्ये त्यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व ७/१२धारक शेतकर्यांना मतदान करण्याचा व पदाधिकार्यांच्या निवडणूकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह असला तरी तो वास्तविकतेला धरुन नसल्याचा दावा भारकाँ चे ज्येष्ठ नेते एड. साहेबराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पुढे त्यांनी सांगितले की या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूकीची ही पध्दत अतिशय क्लिष्ट होईल.
मतदार यादी तयार करतांना गाव नमुना ७ मधे ज्याचे नाव तो मतदार अशी या कायद्याची संकल्पना असल्याने अनेक ७/१२ मधे ८,१०,१२ नावे समाविष्ट आहेत, मग त्या सर्वांनाच मतदान करता येईल का, किंवा त्यांचा एक प्रतिनिधी मतदान करेल याबाबत या कायद्यात स्पष्टता नाही. अनेक ७/१२ धारक शेतकरी हे कुठेतरी बाहेर गावी असतात किंवा कामानिमित्त भारता बाहेर ही आहेत त्यांची शेती प्रत्यक्षात दुसरे कुणी तरी वहीत करतात, अशा परिस्थितीत ७/१२ धारक शेतकरी मतदार असेल की शेती वहीत करणारा मतदार असेल याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
अशाप्रकारे अतिशय क्लिष्ट होणाऱ्या ह्या निवडणुका खर्या अर्थाने शेतकर्यांना न्याय देणार्या होणार नाही. त्यामुळे जुन्या कायद्यानुसार च बाजार समितीच्या निवडणूका घेण्यात याव्यात व शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
पण त्याकरीता कर्मचाऱ्यांची संख्याबळ निवडणूक प्रक्रिया व अनेक तांत्रिक बाबी ७/१२ मध्ये असल्याने मतदार यादया पुर्ण होतीलच कशा आणि निवडणूक होईल केव्हा? असा प्रश्न उपस्थित करून पहिलेच डबघाईस आलेल्या बाजार समित्या अधिक डबघाईस जाण्यास वेळ लागणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.