स्मशानभूमीचा खराब झालेला रस्ता तात्काळ बनवा मनसेचे जळगाव जामोद नगरपरिषदेला निवेदन
प्रतिनिधी नागेश सुरंगे
वाडी खुर्द भागातील समशान भूमीचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक २५ जुलै रोजी नगरपरिषद मुख्यधिकारी यांना निवेदन दिले यावेळी स्मशानभूमीचा अतिशय खराब झालेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 15,-8 -2022 रोजी नगरपरिषद समोर उपोषण करण्यात येईल असे या निवेदन मध्ये नमूद केले आहेत जळगाव जामोद शहरांमधील व वाडी खुर्द येथील भागातील प्रेतयात्रा निघताना होत असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच अत्यंत दुःखदायक हा प्रसंग आहे अन्य ठिकाणच्या स्मशानभूमी स्वर्गा सारखे वाटतात परंतु आसलगाव (वाडी खुर्द) भागातील स्मशानभूमीला साधा रस्ता नाही. याचे कारण कोणत्याही प्रकारची विकास काम होत नाही जळगाव जामोद नगरपरिषद या कार्यालयाच्या मार्फत आतापर्यंत कोणतीही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही सामान्य नागरिकांना चिखल गारा याच्यातून जाण्याची वेळ आणली आहे आणि
याचे अत्यंत दुःख वाटते..न.प. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी जळगाव जामोद नगरपरिषद यांना निवेदनात आंदोलनाचा सुध्दा इशारा दिला आहे निवेदन देताना महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष राजू राऊत ,शहर अध्यक्ष नागेश भटकर ,शहर संघटक वैभव येनकर , भगवान भगत ,प्रमोद देऊन जगदेव डांगे, यांच्या सह मनसेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते