Breaking News
recent

शासनाने द्यावी प्रति हेक्टरी पन्नास हजाराची मदत. सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



 मलकापूर प्रतिनिधी

"मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट" बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटात. 

     वरुण राजाने दडी मारल्याने मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट ओढवले आहे बळीराजा आधीच कर्जबाजारी झाला असताना व सुलतानी संकटांचा सामना करीत असताना वरुण राजाने दिलेल्या दग्यामुळे अस्मानी संकटात सुद्धा सापडला आहे. आत्महत्ये शिवाय बळीराजा ला पर्याय उरलेला नाही.                 

     तरी आपण मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या बळीराजाची ही व्यथा समजून घेऊन बळीराजा ला विना विलंब तात्काळ कोणत्याही पंचनाम्यांची वाट न बघता झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून व परत पेरणीसाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन बळीराजा स सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी व बळीराजाचे पाठीशी आपण व आपले सरकार भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून द्यावे. अशा आशयाचे निवेदन  दिपक पाटील यांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनाची प्रतिलिपी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पाठविण्यात आली आहे.

Powered by Blogger.