Breaking News
recent

बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणामुळे पुलाचे काम अर्ध्यावर, नागरीक त्रस्त

 


संग्रामपूर

    संग्रामपूर तालुक्यातील वरवट ते सोनाळ्याच्या कैची फाटा म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या, बावनबीर जवळ सुरु झालेल्या पुलाचे काम उन्हाळ्या पासुन जवळपास 8-ते 10 महिने उलटून गेल्यावर सुद्धा अर्धवट पडून आहे, या पुलाच्या या कामाची माहिती असणारे,काम कधी सुरू झाले, पूर्ण केव्हा होणार,कामाचा निधी,तपशील इत्यादी सूचना मिळणारे कोणतेही फलक  कामावर लावलेले नाही.

     याच रोडवर जवळच 100 मीटर अंतरावर एकाच वेळेत सुरू झालेल्या बावनबीर येथील विश्राम भवन समोरील इतर ठेकेदाराचे काम मागील 2 महिन्यांपूर्वी पुर्ण झालेले  आहे.त्याचप्रमाणे एकलारा फाट्याजवळ सुरू असलेले पुलाचे काम याच वेळेत सुरू असताना अद्यावत पूर्णत्वास आलेंले असून वाहतूक सुध्दा पुलावरील रोडवर सुरू झाली आहे. मात्र रखडलेल्या या पुलाचे काम अद्याप पर्यंत पूर्ण झाले नसुन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये   वाहनधारकांना रोडच्या साईटने वाहने काढावी लागतात्.

     पावसामुळे या ठिकाणी गाड्या सुद्धा स्लिप होत आहेत यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, श्रावण महिन्यामध्ये मांगेरी महादेव आणी जटाशंकर कडे जाणाऱ्या हजारो भक्तांची खुप मोठी वर्दळ या रस्त्याने होत असते वरवट बकाल संग्रामपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बावनबीर गावासह टुनकी,सोनाळा या आदिवासी भागामधून शाळेतील अनेक विद्यार्थी तसेच नागरिकांची याच रस्त्याने ये-जा आहे, रस्त्याने या भागातीलय रुग्ण अंबुलन्स द्वारे नेण्यात येतात या रस्त्याने भरपूर वर्दळ असताना सुद्धा या पुलाचे काम कधी पूर्ण होईल ??

    अशी चर्चा होत आहे कामाच्या संबंधित बांधकाम विभाग यांच्यासोबत काही वांहन धारकांनी संपर्क केला असता संबंधित विभागाकडून उळवा -उडवी चे उत्तरे मिळाली आहेत  याकडे लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार ?असा पश्न वाहनधारक तसेच नागरिकांकडून होत आहे

Powered by Blogger.