Breaking News
recent

विविध वार्डमधील नागरिकांच्या समस्या लवकर मार्गी लावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने आंदोलन करेल



नांदुरा ( प्रतिनिधी) 

विविध वार्डमधील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाहीमार्गाने आंदोलन करेल असा इशारा मुख्याधिकारी तसेच प्रशासक नगरपरिषद नांदुरा यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील नालंदा नगर, इगंळे ले-ऑऊट, गोठी व नथ्थाणी ले-ऑऊट तसेच वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन दिल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यातही वा.न.१ मधील नागरिकांनी दि.२५ जूनला मुख्याधिकारी नांदुरा यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे समस्याचे निवारण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    ह्या निवेदनाची प्रत वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष यांना सुद्धा  प्राप्त झाली आहे. त्याची पक्षाच्या वतीने गंभीर  दखल घेऊन दि.४ जुलैला मुख्याधिकारी नगरपरिषद नांदुरा यांना लेखी निवेदन देण्यात आले. वा.क्र.१ मधील नागरिकांनी दिलेल्या  निवेदनाची दखल घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने जन  आंदोलन उभारेल असा इशारा ह्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

    निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी बुलडाणा ,उपविभागीय अधिकारी, मलकापूर व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत. ह्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे, तालुका महासचिव मधुकर तायडे, भगवान इंगळे, गणेश बांगर, जानराव हेलोडे, अरूण तायडे, संजय इंगळे, अनिल तायडे, गणेश वानखडे, रमेश ठाकरे, गजानन वाघ, राजु तायडे, अजाबराव गाडे, शिवाजी गोरे, रतन डोंगरदिवे, राहुल खंडेराव, राष्ट्रपाल सपकाळ इत्यादींच्या सह्या आहेत.


Powered by Blogger.