Breaking News
recent

गोवंशाची निर्दयतेने होणारी अवैध कत्तल थांबवण्यासाठी , व अवैध वाहतुकीवर कारवाई बाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने निवेदन

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    गोवंशाची निर्दयतेने  होणारी अवैध कत्तल थांबवण्यासाठी ,  व अवैध वाहतुकीवर कारवाई बाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने मलकापूर शहर मा.पोलीस निरीक्षक साहेब यांना दिनांक 9 जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

    दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,महाराष्ट्रत गौवंश हत्या प्रतिबंधक कायदा असूनही आपल्या तालुक्यात गौवंश कतलीचे व चोरीचे त्याचा वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण संबंधित पोलीस स्टेशन व अधिकारी व कर्मचारी अधिकारी यांना सूचना देऊन अशा प्रकारचा घटनांवर कारवाई करावी.

   तसेच जिल्ह्यात ज्या जागेवर गुरा ढोरांना  बाजार भरतो त्या जागी बाजाराचा दिवशी दोन पोलिस कर्मचारी देण्यात यावे, जेणेकरून गोवंशाची अवैद्य  व निर्दयतेने कोंबून होणारी वाहतूक, व  गोवंश विक्री होणार नाही. 

   या महिन्यात १० जुलै रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद असून त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी बकरी ईद साजरी करतांना बकरी ऐवजी मोठ्या प्रमाणात गौवंश हत्या केली जाते असे निदर्शनास आले आहे. तरीही महाराष्ट्रात गौवंश हत्या बंदी कायदा लागू असून त्याचे काटेकोर पणे पालन करण्यात यावे.

    या मागणी करिता बुलढाणाच्या मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हाते. आषाढी एकादशी व बकरी ईदएकाच दिवशी येत असल्याने अशा घटनांवर ताबडतोब कारवाई करणे गरजेचे आहे. ह्या घटना थांबवण्यासाठी शहर पोलीस स्टेशन ला गौ- स्कॉड पथक निर्माण करून गौवंश प्रतिबंधक कायदा २०१५ ची अंमलबजावणी व्हावी.तसेच अशा घटना बाबत जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांच्याकडे करण्यात आली.

Powered by Blogger.