सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्यात यावी भाजपा तालुकाध्यक्ष संजय काजळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
दिनांक 07 जून रोजी मा मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात श्री संजय काजळे यांनी म्हटले आहे की राज्यात सेना भाजपा युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याबाबत निर्णय घेतला होता त्यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्रभर स्वागत झाले होते व बरेचसे ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी पारदर्शीपणे कारभार करत त्यांचा हा निर्णय सार्थ ठरविला होता.
परंतु त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला जर जनतेतून सरपंचांची निवड झाल्यास भ्रष्टाचाराला आळा मिळतो व गावातील वातावरण स्थिर राहते त्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी महाराष्ट्रातील आगामी ग्रामपंचायतच्या निवडणुका लक्षात घेता पुन्हा जनतेतून सरपंचांची थेट निवड करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे