Breaking News
recent

टाकळी वतपाळ येथील जि. प. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना महेंद्र सिंग वाघ यांच्या कडून स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप!



नांदुरा जिल्हा प्रतिनिधी( प्रमोद हिवराळे) 

टाकळी वतपाळ येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील १८०सर्व विध्यार्थी यांना टाकळी वतपाळ येथील माजी सरपंच महेंद्र सिंग वाघ यांनी स्वखर्चाने स्पोर्ट्स ड्रेसचे यांचे वाटप केले

                दरवर्षी येथील शाळेतील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य म्हणून ज्या गोष्टीची विध्यार्थ्यांना आवश्यकता भासते त्यानुसार महेंद्र सिंग वाघ हे आवर्जून त्या साहित्याचे वाटप करीत असतात मागील वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले होते या दप्तराचे साठी त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून वाटप केले होते तर या वर्षी विद्यार्थ्यांची गरज ओळखून शाळेतील सर्व जाती धर्माचे विध्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस यासाठी सुध्दा पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे यावेळी त्यांच्याशी बोलताना त्यांनी गावातील बाहेर गांवी जाणाऱ्या विध्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना सुध्दा सर्वतोपरी मदत केल्या जाईल असे सांगितले छोट्या छोट्या गावात आज कान्वेटचे पेव फुटलेले असताना पालकांचा कल आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जेदार शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी पोटाला चिमटा देवून शिक्षणाचा खर्च पेलवत नाही तरी सुद्धा कॉन्व्हेंट संस्कृतीच्या झगमटाला भुलून बऱ्यापैकी आर्थिक कुवत असलेल्या पालकांचा कल कॉन्व्हेंट कडे झुकत आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा विध्यार्थ्यां अभावी ओस पडत आहे परंतु टाकळी वतपाळ येथील शाळा व येथील गांवकरी याला अपवाद आहेत गावात वर्ग पहिला ते आठवीपर्यंत शाळा आहे .



        या शाळेतील विद्यार्थी बाहेरगावी जाणार नाही याची दक्षता सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती, पत्रकार, जाणकार पालक हे घेतात व कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी यांच्या झगमगाटाचा प्रभाव गावातील गोरगरीब विद्यार्थी यांचेवर पडू नये त्यांच्यात न्युनगंड राहू नये म्हणून कॉन्व्हेंट च्या धर्तीवर आपल्या गांवातील विद्यार्थी यांना सर्व बाबतीत अपडेट ठेवण्यासाठी मदत करीत असतात यासाठी गावातील प्रसिद्ध उध्दोजक संजय बगे त्यांचे लहानेबंधु अॅड. शशिकांत बगे हे सुद्धा दरवर्षी विध्यार्थ्यांना मदत करीत असतात या विध्यार्थ्यांचा हुरूप वाढून त्यांच्यात उत्साह निर्माण होतो यामुळे शिक्षक वर्ग सुध्दा मन लावून अध्यापनाचे काम करतात याची परिणिती म्हणून शाळेतील विद्यार्थी एन एन एम एस सारख्या परीक्षा उत्तीर्ण होत आहे व त्यांना नववी ते बारावी या वर्गापर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते यामुळे पालकांना आपल्या पाल्याचा शैक्षणिक खर्च सुसह्य होतो त्यातचं गावातील दानशूर व्यक्ती यांची सुध्दा मदत मिळते यातून देशात भावी पिढी सुसंस्कृत घडते व पर्यायाने देश सक्षम बनतो म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणतात 

"देणाऱ्याने देत जावे, 

 घेणाऱ्याने घेत जावे! 

घेता घेता एक दिवस, 

देणाऱ्याचे हात घ्यावे"! 


    अशी ही समाजाप्रती दानाची वृत्ती वृध्दिंगत होवो अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.टाकळी वतपाळ येथील सरपंच आकाश वतपाळ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर राम पांडव,गजानन गव्हाळे,सुरेन्दसिंग वतपाळ,बिरबलसिंग वतपाळ,पुरुषोत्तम पांडव,गजानन तायडे,सदानंद तायडे,विजय तायडे,विजयसिंग वतपाळ ,मोहन वसतकार, अनिल गोरे, पुरुषोत्तम उखर्डे, निवृत्ती सुशिर, रमेशशेठ  पांडव, शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद सर, व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन दिनेश ब्राह्मणे यांनी केले तर आभार नारखेडे सर यांनी मानले.

Powered by Blogger.