पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
नागेश सुरंगे मलकापूर प्रतिनिधी
तालुक्यातील ग्राम वाघुड येथे दिनांक ०९ जुलैच्या रात्री पतीसह सासरच्या मंडळींच्या अत्याचाराला कंटाळून २६ वर्षीय विवाहिता ज्योती गजनान सनिसे हीने रात्री ३.०० च्या सुमारास प्लास्टिक दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पडली असून १ वर्षीय व ४ वर्षीय तान्ह्या चिमुकल्यां मुलींच्या डोक्यावरील मायेचे, वात्सल्याने आई नावाचे छत्र हरवले आहे. याबाबत तोडी रिपार्ट पोस्टे मलकापुर शहरला दिनांक ०९ जुलै रोजी मृतक ज्योती हीचा भाऊ सागर मनोहर वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार मृतक लहान बहीन ज्योती हिचा विवाह दि. १९ मे २०१७ रोजी गजानन दशरथ सनिसे यांचेसोबत झाला होता. बहिणीच्या सासरकडील मंडळींना लग्नामध्ये भेटवस्तू दागीने व ४००००/रु हुंडा दिला होता. त्या लग्नापासुन बहिनीला जान्हवी वय ४ वर्ष व तनवी वय १ वर्ष अशा दोन गुली आहेत.
बहिन ज्योती हिला तिचे सासरचे मंडळीने लग्नानंतर सात ते आठ महीने चांगली वागणूक दिली नंतर काही दिवसांनी छोटया छोटया कारणावरून बहीणीस शिवीगाळ व मारहाण करीत होते. बहीणीचे पती गजानन सनीसे यांच्याकडे स्वः ताची कुझर गाडी असुन ते दारुच्या आधीन होते. गाडीचे भाडयामुळे ते आठ आठ दिवस बाहेर गावी राहत असत व घरी आले की माझी बहीण ज्योती हिची सासु इंद्रायनी दशरथ सनिसे व जेठ दिपक, राजु, व त्यांच्या पत्नी हया बहीणीचे पतीला एकच दोन सांगत असत त्यामुळे पती गजानन हा
तिला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे मला बहीणीने सांगीतले होते. यापूर्वी पतीचे मारहाणीत ज्योती हिचा हात व पाय सुदधा फॅक्चर झाला होता परंतु पती-पत्नीतील वाद आसल्याने आम्ही तेव्हा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता. काही दिवसापूर्वी बहीणीचा पती गजानन हा म्हणाला होता की आमची गाडी ना दुरुस्त झाली आहे ती दुरस्त करण्याकरिता मला ५००००/- रु ची आवश्यकता आहे अशी मागणी केल्याने बहीणीच्या संसाराकडे पाहून आम्ही ५००००/- रू दिले होते. नेहमीच्या वादामुळे आम्ही बहीण ज्योती हिला आमच्याकडे घेवून आलो होतो. बहीण ज्योती आमचे कडे असतांना तिचा पती हा २ ते ३ वेळेस तिला नेण्यास आला परंतु आम्ही बहीणीस पाठविले नाही. परंतु, अंदाजे १ वर्षांने ज्योती तिचा पती गजानन हा तिला घेण्यास आला तेव्हा आम्ही तिला विरोध केला होता परंतु तो आमचे घरी येवून माझ्या आईस शिवीगाळ करून माझ्या बहीणीला जबरीने सोबत घेवून जात होता त्यावेळी त्याने मुलीली घेवून जाईल अशी सुध्दा धमकी दिल्याने बहीण सासरी गेली होती.
त्यावेळी गावातील कमलाबाई निनाजी इंगळे, कमल संतोष सपकाळ ह्या हजर होत्या. बहीण सासरी आल्यानंतर सुध्दा सासरच्या मंडळीचे वागणुकीत काहीएक फरक पडला नाही. तसेच आम्ही तिला भेटण्यास गेलो असता बहीण ज्योती हिचा नवरा गजानन व सासरच्या मंडळीनी आम्हाला सुध्दा तुम्ही आमच्या येथे यायचे नाही जर तुम्ही आलात तर तुम्हाला जिवाने मारून टाकान अशी धमकी दिली होती. त्यामुळे आम्ही तिचे घरी जात
नव्हतो परंतु बहीण अधुन मधुन माझा भाऊ गोपालशी फोनवर बोलत होती. तसेच बहिणीला दुसरी मुलगी झाली तेव्हा तिचे सासुने तुला मुलगा का झाला नाही असे म्हणून नेहमी शिवीगाळ करीत होती तसेच ननंद ज्योती विलास दावगे ही सुध्दा माहेरी आली तेव्हा काही ना काही कारणाने शिवीगाळ करून टोमणे मारत होती. तसेच अंदाजे दिड महीण्यापूर्वी सुध्दा त्यांचे घरामध्ये वाद झाल्याने तिला मारहाण करण्यात आली होती त्यानंतर ती सकाळी सडासला जाण्याचे कारण दाखवुन दोन्ही लहाण मुली सोडून पायी उमाळी येथे जाण्या करीता निघाली परंतु ती थकल्याने घीर्णी येथील गजानन महाराज मंदीर येथे थांबली होती. परंतु तिचे पतीने तिचा शोध घेवून तिला घरी घेवून गेला होता. आज दिनांक ०९ जुलै रोजी सकाळी ०६ ला भागवत राजकर हे आमचे घरी आले व त्यांनी सांगीतले की बहीण ज्योती गजानन सनीसे हिने फाशी घेतली.
यावरून माझी बहीण ज्योती गजानन सनिसे हिला तिचा पती गजानन दशरथ सनिसे, सासु इंद्रायणी सनिसे, सासरे दशरथ सनिसे, जेठ दिपक सनिसे, जेठानी नंदा राजु सनिसे, सविता दिपक सनिसे सर्व (रा. वाघुड) व नणंद ज्योती विलास वावगे (रा. वरणा ता. खामगाव) यांचे जाचाला कंटाळुनच तिला गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. अश्या फिर्यादीवरून एकूण ८ जणांवर भारतीय दंड संहिता कलम ३०६,३०४ व ४९८ अ. ३४ नुसार शहर पो स्टे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत सासरच्या अमानवीय त्रासाला कंटाळून विवाहितेची हत्या की आत्महत्या? हे गूढ असल्याची चर्चा आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेतील सर्वेदनशिलाता लक्षात घेऊन वाघुळ गावात पोलीस प्रोटेक्शन मध्ये अंतिम संस्कार कार्यक्रम पार पाडला. त्यानंतरच स्मशानभूमीतूनच आरोपी पतीला मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.